शंभर कोटी क्लब : चित्रपट यशाचं बदलतं परिमाण
चित्रपट म्हणजे नेमक काय ? त्याकडे कलात्मक दृष्टीने पहिले पाहिजे कि मनोरंजन या हेतूने ? याबाबत अनेक मतांतर आढळतात.खरंतर चित्रपट म्हणजे मानवी भावनांचं पडद्यावर उमटणारं प्रतिबिंब आणि या कल्पकतेच्या दुनियेशी रसिकांनी समरस व्हावं,त्यात रंगून जावं यासाठी श्रुजनशील प्रतीभेद्वारा स्फुरलेल्या कल्पनांचं केलेलं रेखाटन,ते अनुभवताना रसिक हर्षभरित,अस्वस्थ,खिन्न झाला तर साधारणतः चित्रपट परिणामकारक झाला असं मानलं जातं,पूर्वी एकाच सिनेमागृहात पन्नास,शंभर आठवडे चालणाऱ्या सिनेमांची यशस्वी सिनेमांमध्ये गणती व्हायची पण बदलत्या कालानुरूप चित्रपटांच्या यशाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत,हल्ली सिनेमांनी १०० कोटी कमावले म्हणजे तो यशस्वी असा समज रूढ होत चालला आहे.मग आठवड्याभरात जरी कोटींचा व्यवसाय करून सिनेमा थिएटरमधून उतरला तरी चालेल.एकंदरीत चित्रपट श्रुष्टीमद्धे सध्या ' शंभर कोटीं क्लब' चा दबदबा आहे,अमीर खान च्या 'गजनी' चित्रपटापासून सुरु झालेल्या या क्लब चा सदस्य असण म्हणजे आज गौरावास्पद बाब मानली जाते,
चित्रपट प्रदर्शनाची तारीख अगदी वर्षभर आधी ठरवली जाते,त्यामुळे त्यादिवशी इतर मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ दिले जात नाहीत (किवां निर्मातेही ते जाणीवपूर्वक टाळतात),वर्तमानपत्रे, मासिकं, टीव्ही वाहिन्या, रेडिओ केंद्रे अश्या सर्व ठिकाणी या चित्रपटांची प्रसिद्धी केली जाते त्यासाठी ३० ते ४० कोटी रुपये खर्च केले जातात,सोबतच सिनेमात मोठे स्टार्स असतील तर प्रेक्षकांचा चित्रपटाला हमखास प्रचंड प्रतिसाद लाभतो त्यामुळेच कि काय 'एक था टायगर',' रेडी','चेन्नई एक्स्प्रेस' असे कथानकात फारसा दम नसलेले सिनेमेही बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींच्या वर गल्ला जमवितात.त्यामुळे सिनेमागृहांचे गणित,प्रदर्शनापूर्वी केलेली प्रसिद्धी या जोरावर सिनेमा कोटींवर पैसे कमावतो,चित्रपटाच्या निर्मितीपासून विचार केला तर तो प्रदर्शित होई पर्यंत जवळ जवळ ८० ते ९० कोटी खर्च होतात त्यामुळे प्रत्येक्षात खर्च वजा जाता खरी कमाई किती याचा विचार करावा लागेल.
आजच्या चित्रपट श्रुष्टीत असा समाज होत चालला आहे कि चित्रपट किती चित्रपट गृहात हाउसफुल चालला ? किती कोटींची कमाई केली ? हे जाहिराती,सोशल नेटवर्किंग यामार्फत ओरडून जगाला सांगितलं कि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचून तो धावत प्रेक्षक गृहात येयील.पण बाहेर कोटीच्या कोटी कमावल्याच्या बातम्या वाचताना प्रत्यक्षात चित्रपट गृहात केवळ २० ते २५ प्रेक्षक दिसतात.असो हा बदलत्या काळाचा महिमा असला तरी जे रसिक चित्रपटातून मिळालेले मानसिक (आत्मिक) सुख पाहतात त्यांच्यावर या आकड्यांचा विशेष परिणाम होताना दिसत नहि,त्यामुळे अनेक चित्रपट रसिकांच्या ह्रिदयात स्थान मिळवतात हे यश पैशात न मोजता परिणामात मोजले जाते.
पूर्वीच्या 'मदर इंडिया','मुगल-ए-आझम','बॉबी' या चित्रपटांचे ज्यूबली यश लक्षात घेताना त्याची आर्थिक बाजू कोणालाच तपासावीशी वाटली नाही.जुन्या काळी अमिताभच्या फ्लॉप चित्रपटांची कमाई इतर 'जुबली हिट' चित्रपटांपेक्षा जास्त असल्याच्या चर्चा व्हायच्या असे जाणकार सांगतात.चित्रपट बदलला तसेच यशाचे परिमाण देखील बदलत चालले आहे,बऱ्याचदा असं होऊ शकतं की व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असलेला चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला तो आवडेलच याची शाश्वती देता येत नाही,त्यामुळे निर्माता,दिग्दर्शकांनी व्यावसायिक दृष्टीकोनासोबतच कलात्मक दृष्टीकोनही जपायला हवा आपली कलाकृती कितपत रसिकांना आवडेल याचा विचार व्हावा अन्यथा या आकड्यांच्या ओझ्याखाली दबून त्यातली कल्पकता हरवू नये म्हणजे मिळवलं.
------------------------------------------------------------------------------------------------------
"नुकताच मी मद्रास कॅफे हा चित्रपट बनवला असून यामद्धे कलात्मकता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे,हा चित्रपट कितपत व्यवसाय करेल,याची काळजी आम्हाला नाही.चित्रपट वेगळ्या धाटणीचा असून यावर मी पाच,सहा वर्षांपासून काम करत आहे, शिवाय 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारे सगळेच चित्रपट खूप दर्जेदार असतात, हा समजच चुकीचा आहे.''
- जॉन अब्राहम.
-------------------------------------------------------------------------------------------------------
"मी कधीच प्रेक्षकांना निराश करत नाही,प्रेक्षकांना जे हवे ते देण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो आणि मी बर्याच वेळा त्यात यशस्वी झालो आहे,हे यापूर्वी माझ्या चित्रपटांच्या कामाईतून सिद्ध झालेले आहे".
- साजिद खान
-------------------------------------------------------------------------------------------------------
- श्रीनिवास कुलकर्णी.
No comments:
Post a Comment