Sunday, September 22, 2013

Amitabh Bacchan . . . अमिताभ बच्चन यांची अविस्मरणीय भेट . . .

अमिताभ बच्चन यांची अविस्मरणीय भेट . . . 

अमिताभ बच्चन यांची ‘जलसा’ या त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय स्वप्नवत क्षण . . . .
गेल्या २८ वर्षापासून दर रविवारी अमिताभ बच्चन साहेब आपल्या असंख्या चाहत्यांना दर्शन देतात,भेटतात.दर रविवारी सायंकाळी ६ वाजता जलसा या त्यांच्या निवासस्थानाचे दरवाजे २ मिनिटांसाठी उघडले जातात आणि त्यादरम्यान चाहत्यांना अवघ्या ३ फुटांवरून या महानायाकाचे दर्शन घडते.यासाठी आजही त्यांचे असंख्य चाहते दर रविवारी ‘जलसा’ वर हजारोंच्या संख्येने दुपारी ४ वाजल्यापासून ताटकळत उभे राहतात.अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांची एक झलक बघायला मिळावी,अशी माझी मनापासून इच्छा होती,ती पूर्ण झाली ती त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ती म्हणजे १ ० ऑक्टो. २०११ रोजी.संपूर्ण कौन बनेगा करोडपती आपण दूरसंच्यावर जसा पाहतो तसा एकदाही विश्रांती न घेता अखंड चित्रित होतो हि माझ्यासाठी एकदम नवी गोष्ट होती याअगोदर मी अनेक रिअलिटी कारेक्रमांच्या चित्रीकरणाला उपस्थित होतो त्यामुळे हा अखंडपणा प्रथमच माझ्या पाहण्यात येत होता,चित्रपट श्रुष्टीमद्धे वन टेक दृश्य देणारा अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांची ख्याती आहे ती खोटी नव्हे . . . त्यावेळी माझे मित्र नागेशजी,आणि बापटजी यांच्या बच्चन कुटुंबियांशी असणार्या स्नेहामुळे त्या कारेक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती,बच्चन जी यांचे स्वीय सहायक हे अगदी आम्ही पुण्यावरून निघेपासून ते कारेक्रमात बसेपर्यंत,आणि तेथून निघेपर्यंत कायम आमच्या संपर्कात होते.अगदी कारेक्रामाचे स्टील फोटो काढणार्या पर्यंत त्यांनी सर्व सेटिंग लावली होती आणि त्यामुळेच आम्हाला २ र्या असन क्रमांकाची सीट मिळाली आणि हे छायाचित्र देखील.




असो कारेक्रम सुरु होण्यापूर्वीच्या वेळात अमिताभ हे प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस करत,आणि विचारलेल्या प्रश्नाला प्रत्येकाला तेवढ्याच आत्मीयतेने,नम्रतेने उत्तर देत . . . 
माणसाला एखादी गोष्ट मिळाली ती त्याची हाव वाढतच जाते. त्याप्रमाणे मला त्यांना काही क्षण का होयीना भेटण्याची इछ्या झाली आणि असलेल्या ओळखी मुळे सुरक्षा ओलांडून त्यांच्या गाडी बाहेर सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ उभे होतो पण बच्चन साहेब चित्रीकरण वेळी कोणाला भेटत नाहीत हे हि समजले आणि ते संपण्यास रात्री १  होते आणि शिवाय भेटण्याची शाश्वती नव्हती पण चित्रीकरण तंत्र,प्रसिद्धीच्या,यशाच्या शिखरावर असताना देखील कसे जमिनीवर राहावे रसिकांशि कसे वागावे हे त्यांच्या कडून प्रत्येकाला शिक् ण्यासारखेच आहे.    
असो या महान व्यक्तीला भेटण्याची प्रचंड इछ्या जागृत झाली आणि तेव्हा पासून त्यांना प्रत्येक सणाला,त्यांच्या चित्रपटाबद्दल अभिप्राय पत्राने कळवायला लागलो,त्यांना मी तब्बल ३७ पत्र आत्ता पर्यंत पाठवली आहेत पण त्याचा विशेष उपयोग झाला नाही,मेहनती पेक्षा वशिला मोठा झाल्याच हे द्योतक आहे.असो . . .  

त्यानंतर २०१२ मद्धे पुन्हा KBC चे पास मिळाले आणि नेमकी "वर्तमान" या चित्रपटात मला भूमिका मिळाली होती आणि त्याच दिवशी चित्रीकरणाला आम्हाला बोलावले होते पण कामाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे म्हणून मी त्यावेळी जाऊ शकलो नाही पण माझ्या एवेजी श्रेयसजी हे बच्चनजींचे मोठे चाहते होते त्यांचा नंबर लागला,त्यांनी कारेक्रम पाहिला असलेल्या ओळखीमुळे बच्चन साहेब यांची स्वाक्षरी मिळवली आणि अगदी आनंदाने बेभान झाले आणि मला फोन वरून हि गोष्ट कळली तेव्हा एका निस्सीम चाहत्याची भेट झाल्याने  प्रचंड आनंद वाटला आणि नेमकी माझी शूटिंग याच दिवशी यायची होती हा स्वार्थ वजा (खंत युक्त) विचार देखील येउन गेला.पण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते म्हणतात ते खरेच आहे.

     २ १ जुलै २ ० १ ३ रोजी माझी आवडती गायिका श्रेया घोशाल ला भेटण्याचा योग आला होता त्यासाठी फिल्म सिटी मुंबई येथे इंडिअन आयडॉल चे पास आम्ही चांगल्या संपर्कामुळे सोनी वाहिनीकडून मिळवले होते.आणि चित्रीकरण २.३० या वेळी सुरु होणार होते,आम्ही तेथील रिलयिन्स स्टूडीओ मद्धे पोहोचलो,कारेक्रमात बसलो देखील. पण त्यागोदर सहज एक संदेश आम्ही बच्चन यांच्या स्वीय सहायकाला पाठवला कि आम्ही मुंबई मद्धे आलो आहोत (हा संदेश पाठवण्याची माझी अजिबात इछ्या नव्हती तरीदेखील अशा आणि प्रयत्न . . . ). आणि त्यानंतर मोबयील silent मोड वर करून कारेक्रम सुरु होण्याची वाट पाहू लागलो,कारेक्रमाला अजून अवधी होता, वेळ जावा म्हणून आम्ही पुन्हा मोबयील बाहेर काढला तर त्यांच्या सहायकाचे तब्बल ५ मिसकॉल दिसले,पण आता कारेक्रमामधून बाहेर पडता हि येत नव्हते आता काय करणार ? ? ?
मग अंगात अभिनयाचे गुण  आहेत त्याचा उपयोग  केव्हा होणार ?
तडक उठलो आणि तिथल्या माणसाला बाहेर जायच आहे असा सांगितल तो सहज जाऊ देणार नव्हताच त्यामुळे बाथरूम ला जाने प्रचंड गरजेचे आहे हे सांगून मी बाहेर पडलो पण माझे मित्र मद्धे अडकले मग त्यांनी सुद्धा काहीतरी कारण सांगितला तडक बाहेर पडलो.
तेथून रिक्षा केला आणि त्यांना सांगितल जुहु ला जलसा ला सोडा त्यांनी मला तो परिसर किती पाठ आहे आणि आम्हाला कलाकाराचे काहीहि आकर्षण वाटत नाही याचे किस्से जायीपर्यंत ऐकवले आणि शेवटी एका बंगल्याबाहेर थांबवून समोर जलसा आहे असे सांगितले आणि भाडे रु १५७ घेऊन तो निघून गेला,त्यावेळी पाऊस  सुरु होता आम्ही दोघे हातात छत्री घेऊन ४.३० पासून ५ वाजेपर्यंत त्या बंगल्या बाहेर बसून होतो पण त्यांना रविवारी भेटायला अलोट गर्दी होते हे वाक्य आता खोटे वाटायला लागले होते कारण बंगल्या बाहेर आम्ही दोघेच . . .

मग काही वेळाने २ मुलं  आमच्या बाजूला आली आणि त्यांनी प्रश्न केला . . .
" हा अभिषेक बच्चन यांचा "प्रतीक्षा" ना ? "

"अरे नाही हा अमिताभ बच्चन यांचा "जलसा" आहे"

( अनेकवेळा माझेच खरे हा फुकटा आत्मविश्वास दाखवण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न करतो आणि लगेच जमिनीवर आपटतो देखील  . . .)

"अरे हा जलसा नाही जलसा मला माहित आहे तो पुढे सिग्नल ला आहे "

असो तो म्हणाला मी जलसा कडे चाललो आहे तुम्ही येणार असाल तर चला शेवटी लवकर समाजल्याबद्दल देवाचे आभार मानत आम्ही जलसा बाहेर गेलो पहातो तर चाहत्यांची प्रचंड अलोट गर्दी.






त्याच गर्दीत आम्ही एक झालो आणि त्यांच्या सहायकाला फोन केला ते बाहेर आले आणि वशिल्याने आम्ही एकदम शेजारी दारा समोर थांबलो.६ वाजले बच्चन साहेब आले जलसा चे दरवाजे उघडले गेले आणि अनेक जणांनी मंत्रमुग्ध तो क्षण डोळ्यात साठवला.मी तर केवळ हात जोडून पाहत होतो.त्याच गर्दीत दिग्दर्शक सुधीर मिश्रा आले आणि आत जाऊन थांबले.काही वेळात जलसा चे दरवाजे पुन्हा लावले गेले आणि त्यांच्या सहयाकाने आम्हाला आत बोलावले दरवाजा उघडून आम्ही आत गेलो समोर अंगणात बच्चन साहेब थांबलेले हातातली छत्री तेथेच टाकून बच्चन साहेबांना साष्टांग नमस्कार केला आणि सिलसिला,सात हिन्दुस्तानी,डॉन,शराबी या चित्रपटांची नावे घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो पण शेवट पर्यंत शब्दच फुटेनात मग साहेबांचा "निशब्द" आठवला आणि गप्प बसलो,
त्यांना ते लक्षात आले आणि छोटेसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटले . . .

आणि माझा नेहमीचा  हसतमुख चेहऱ्याने बाजूला जाऊन उभे टाकणे आणि सोबत छायाचित्र काढून घेणे हा महत्वाचा कारेक्रम उरकून घेतला


सुधीर मिश्रा हे अमिताभ यांच्या  ए बी कोर्प या संस्थे मार्फत निर्माण होणार्या आगामी चित्रपटाची चर्चा करण्यासाठी उभे होते,अतिशय नम्रतेने अमिताभजींनी आमचा निरोप घेतला . . .

आदरयुक्त भीतीने माझे हास्य कुठल्या कुठे गायब झाले होते,आणि माझ्या बर्याच मित्रांनी याबाबत जेव्हा मला विचारल
कि अरे तू बच्चनजींच्या फोटोतच हसलाच नाहीस ?
त्या वेळी मला क्षणभर मिल्खा सिंग असल्याचा भास झाला . . . केवळ शेवटच्या क्षणी मागे वळून पाहिल्यामुळे त्याचे मेडल हुकले तसेच माझ्या फोटोच्या बाबतीत झाले कि काय ? ? ?

गमतीचा भाग सोडला तर खरोखरच त्यांना भेटणं,त्यासाठी प्रयत्न करण या केलेल्या श्रमाचं ते साफल्य होत आणि तो क्षण अविस्मरणीयच होता . . .
असा म्हणल जातं कि तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करत गेलात आणि त्या दृष्टीने योग्य प्रयत्न केले तर नक्की यश हे मिळतेच . . . खरच हा साक्षात्कार मला झाला . . .

थोडक्यात भेटायला गेलो श्रेया घोशाल ला आणि भेटून आलो शहेनशाह अमिताभ बच्चन ला . . .

- श्रीनिवास कुलकर्णी.           

No comments:

Post a Comment