Saturday, December 21, 2013

मुलाखत इशा कोप्पिकर



मुलाखत इशा कोप्पिकर



खल्लस गर्ल इशा कोप्पिकर मुंबईच्या माहीम परिसरात वाढलेली मराठी कोकणी मुलगी अठरा-वीस वर्षापूर्वी मॉडेलिंगमध्ये आली आणि तिथून थेट दाक्षिणात्य चित्रपटांत चमकली. त्यानंतर हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांत काम करत करत ती आता मराठी चित्रपटात पदार्पण करतेय.याविषयी तिच्याशी केलेली खास बातचीत…

# ईशा तुझ्या अभिनय प्रवासाविषयी सांग ?

मी मुंबईच्या रामानंद रुईया महाविद्यालयातून पदवीधर झाले,त्यानंतर सुप्रसिद्ध फोटोग्राफेर गौतम राजाधक्ष्य यांच्याकडून मी फोटो काढून घेतले,त्यानंतर मिस इंडिया मद्धे भाग घेतला त्यात मला मिस टैलेट म्हणून गौरवण्यात आले,त्यानंतर मला तमिळ मद्धे तेव्हा मला एका दक्षिण भारतीय दिग्दर्शकाकडून एका ‘काधल कविथाई’ या तमिळ चित्रपटाची ऑफर आली होती. त्यात माझ्याबरोबर अरविंद स्वामी होता आणि संगीत दिग्दर्शन ए. आर. रहेमानचं होतं.त्या काळात या जोडीने ‘रोजा’, ‘बॉम्बे’सारखे चित्रपट दिले होते त्यामुळे चित्रपट स्वीकारला.


# चित्रपट क्षेत्रात गॉडफादर,घरनेशाही याबद्दल तुज़े मत ?

हो बाहेरून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करत असाल तर तुम्हाला नक्कीच प्रचंड कष्ट करण्याची तयारी हवी,घराणेशही मुळे त्या कलाकारांना मोठया बॅनरकडे काम करण्याची संधी लगेचच मिळते,जि कि आज देखिल अनेक गुणवंत कलाकाराना मिळालेली नाही,यावर आपण काही करु शकत नाही,फक्त आपण आपले काम प्रामनिक पणे करत रहावे.

# मराठीत काम करायला एवढा वेळ का घेतला ?

मराठीत अनेक संहिता मझयाकडे यागोदर आल्या पण त्या न आवडल्याने मी नकारल्या,दुसरी गोष्ट म्हणजे मराठीत स्क्रिप्ट चांगली असायची,पण निर्मितीमूल नसायचे.मराठी चित्रपटांचा निर्मिती खर्चही वाढू लागला आहे,मराठी चित्रपटांत काम करावं,अशी माझी स्वत:ची  इच्छा होती.त्यानंतर "मात" या चित्रपटाची कथा ऐकली मला ती आवडली त्यामुळे मराठीत येण्याची यापेक्षा दुसरी चांगली संधी मिळणार नाही असे वाटले आणि हा चित्रपट स्वीकारला.


# ‘मात’ मधील तुझी व्यक्तिरेखा कय आहे ?

या चित्रपटात मी एका मध्यमवर्गीय विवाहित स्त्रीची भूमिका करतेय,जि कि खूप टॅलेंटेड आणि खंबीर आहे,तिच्या आयुष्यात काही घडामोडी घडतात आणि तिच जीवन पूर्णपणे बदलून जातं.त्यानंतर ती आयुष्याला कशी सामोरी जाते,याची कथा या चित्रपटात आहे.हा एक स्त्रीवादी चित्रपट आहे आणि यातली माझी भूमिका माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी आहे.

# मराठी चित्रपटांचे निर्मितीमुल्य कमी असते अशी ओरड होते तसा तुला काही अनुभव आला का ?

मराठी चित्रपतंबद्दल हि ओरड होते,पण हल्लि मराठी मधेहि निर्मिती खर्च वाढलेला आहे.‘मात’ या चित्रपटांच्या निर्मात्यांचाही हा पहिला चित्रपट आहे.पण मला तरी तसा अनुभव आला नाही अमचया निर्मात्या यांनी आर्थिक बाबतीत कोठेही काहीही कमी पडू दिलेले नाही.

# सध्या तुझ्याकडे कुठले चित्रपट आहेत?

नाही, सध्या कुठलेही चित्रपट मि करत नाहीय. मला काही चित्रपटांची ऑफर आली होती,मी माझ्या स्वत:च्या कामासाठी सध्या व्यस्त  आहे.पण नक्कीच सर्व जमून आल तर चित्रपट करेन.

# युवकाना कोणता संदेश देशिल ?

स्वतःवर विश्वास ठेवा,मेहनत करा यश नक्की मिळते.



- श्रीनिवास कुलकर्णी.


.


No comments:

Post a Comment